१३ सप्टेंबर
शुध्द भावनेशिवाय सर्व व्यर्थ
भगवंत कोणाला दूर असतो?
- जो स्वतःपासून दूर आहे.
- जो बाह्य दृष्टीने स्वतःकडे व भगवंताकडे पहातो.
- जो भोग व दुःख यात वेळ घालवतो.
- जो देहबुध्दीत आहे - देह म्हणजेच मी असं जो मानतो.
- जो मी कर्ता असं मानतो - माझ्यामुळे घडले असे मानतो.
भगवंतप्राप्तीसाठी साधकाने काय करावे?
- जेजे केलं तेते भगवंताला अर्पण करावं.
- अभिमानही भगवंताला अर्पण करावा.
- भगवंताशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा.
- भगवंताशी बोलावे; त्याचे नाम घ्यावे.
- कर्ममार्ग सोडू नये.
- नाम जेवढे घेऊ तेवढा त्याचा अनुभव येतो, हे लक्षात घ्य़ावे.
- आपला भाव शुध्द होण्यासाठी सत्समागम करावा.
- परमेश्वरच आपल्या हातून साधन करवून घेतो हे लक्षात ठेवावं.
- ज्या भगवंताने आपल्याला विद्या, पैसा, प्रकृती दिली, त्याला आपण कधीही विसरू नये.
- भगवंतानं आपल्याला ज्या स्थितीत ठेवलं त्यात समाधान मानून त्याचा विसर पडू न द्यावा.
- जो अंतरंग पाहतो त्याला भगवंत जवळ आहे.
- मनुष्यजन्माला आलो हीच आपण भगवंताचे होण्याची खूण आहे हे लक्षात ठेवावे.
- सतत भगवंताचे ध्यान करावे.
- मनातून आपले भगवंताशी नाते जोडून ठेवावे.
- याच जन्मात सुविचाराने व सद्बुध्दीने भगवंत आपलासा करावा.
॥श्रीराम समर्थ॥