गोंधळ

गोंधळ

काही घराण्यांमध्ये लग्न-मुंज या सारखे मंगलकार्य व्यवस्थितपणे पार पडले की ८-१० दिवसांत देवीचा गोंधळ घालण्याचा कुळधर्म असतो.

medium_gondhal1.jpg

ज्याच्या करवी हे कार्य केले जाते, त्याला गोंधळी म्हणतात.

कार्य -

gondhal3.jpg

एका पाटावर नवीन वस्त्र घालून त्यावर गोंधळी तांदळाचा चौक काढतो. त्याच्या चारी बाजूला खोबर्‍याच्या वाट्या, सुपार्‍या, हळकुंड, केळी ठेवतो. मध्ये पाण्याचा कलश, त्यावर विड्याची पाने, आंब्याचे डहाळे व श्रीफल मांडतो. त्यावर ऊस किंवा शाळूच्या ताटाचे तिकाटणे उभे करतो. कणकीचा दिवा लावतो. दिवटी-बुधली लावतो आणि मग ज्याचे मंगलकार्य झालेले असेल त्यांच्या हातून या कलशरुपी देवांची पूजा करवतो.
नंतर संबळ-तुणतुणे यांच्या साठीवर देवांना आवाहन करणारी कवने, पोवाडे गोंधळी म्हणतात.

पार्श्वभूमी -
परशुरामाने बेरासूर राक्षसाचे मुंडके कापून त्यामध्ये तारा ओवल्या व त्याचे त्याने तुणतुणे केले. आणि तुणतुण असा निनाद करीत तो आपली माता रेणुकादेवी हिच्यापाशी आला. तेव्हापासून गोंधळाचा कुळधर्म सुरु झाला असे मानतात.

॥श्रीराम समर्थ॥