श्रीचिन्मयानंदांनी केलेला अनुग्रह

श्रीचिन्मयानंदांनी केलेला अनुग्रह
----------------------------------
येहळेगावाहून थोड्याच अंतरावर उमरखेड म्हणून एक गाव आहे.
तेथे श्रीचिन्मयानंद नावाचे एक फार मोठे थोर सत्पुरुष राहात असत.
एकदा पंढरपूरची यात्रा संपवून ते परत आपल्या गावी जात होते.
वाटेमध्ये ते येहळेगावी उतरले.
पहाटे उठून ते स्नानासाठी नदीवर गेले. तेव्हा अंधुकसा प्रकाश होता.

स्नान, संध्या करून येताना त्यांना जराशा उजेडात नदीकाठी बसलेला एक माणूस (श्रीतुकामाई) ध्यानस्थ दिसला.
थोड्या वेळाने तुकामाईंनी डोळे उघडले.
दोघांची दृष्टादृष्ट झाली.
दोघांच्याही डोळ्यांतून पाणी वाहू लागले.
श्रीचिन्मयानंद पुढे झाले व त्यांनी श्रीतुकामाईच्या डोक्यावर हात ठेवला आणि "तुकारामचैतन्य" असे नाव ठेवले.
"माझे येथले काम झाले" असे म्हणून ते उमरखेडला निघून गेले.
सद्‌गुरुंचा अनुग्रह झाल्यापासून श्रीतुकामाईंच्या अंगी परमहंसवृत्ति बाणली.

॥श्रीराम समर्थ॥